देऊळगावराजा सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अनियमितता थांबवा
जय शिवसंग्राम संघटनेची मागणी

देऊळगावराजा :- येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी प्रक्रियेत शेतकरी व नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या संदर्भात जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने दुय्यम निबंधक कार्यालयास निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, या नोंदणी व्यवहारांमध्ये खाजगी व अनधिकृत कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप वाढलेला असून दस्त नोंदणीसाठीही अनधिकृतरित्या अतिरिक्त शुल्क घेतले जात आहे. या प्रकाराबद्दल जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात आली आहे.
जय शिवसंग्राम संघटनेने अशा प्रकारच्या अनियमितता थांबवण्यासाठी ६ ठळक मागण्या मांडल्या आहेत.
१) अतिरिक शुल्क आकारू नये.
२) शासकीय दरपत्रक आपल्या कार्यालयात लावावे.
३) अनाधिकृत व्यक्तींना कार्यालयातील कामात सहभागी होऊ देऊ नये.
४) नागरिकांना शुल्क बाबत स्पष्ट माहिती द्यावी.
५) खरेदी दस्त नियम बाह्य असल्यास लेखी कारण द्यावे.
६) नागरिकांना सन्मानाने सेवा द्यावी.
तसेच संघटनेने सदर समस्या व तक्रारीबाबत १५ दिवसांत लेखी उत्तराची मागणी केली असून योग्य ती कारवाई न झाल्यास जय शिवसंग्राम संघटनेचे वतीने दुय्यम निबंधक कार्यालयात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तसेच यातून कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर तालुकाध्यक्ष जहीरखान, शहराध्यक्ष अजमतखान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, शेख इम्रान, असलमखान, साजिदखान, राजेश भाग्यवंत, राजू गव्हाणे, अनिस शहा, किशोर वाघ, शेख अहमद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.